
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले विशेष आभार
राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार-डॉ. मनीष गवई
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता राज्याच्या युवा धोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे ही समिती दर्जा प्राप्त असून राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करणारी महत्वाची समिती आहे ज्याचे अध्यक्ष खुद्द राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री दत्त भरणे हे आहेत. त्यांच्या या विशेष निवडीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच आदेश देखील काढला आहे. आदेश मिळताच राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली असून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहे. अनेक वर्षांपासून राज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अनुभवी मंत्री, अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असून समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्यावर सोपविण्यात आले असून समितीमधील अन्य सदस्यांमध्ये विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे, श्रीकांत भारतीय, अमोल मिटकरी यांच्यासह विधानसभा सदस्य संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे यांच्यासह क्रीडा विभागाचे अपर सचिव, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांचा १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाचे १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी) यांचा समावेश करण्यात आला आहे.या समितीला राज्याच्या युवकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल.ही समिती येत्या तीन महिन्यात सूचना आणि शिफारसींचा विचार करून नवीन युवा धोरणाचा मसुदा तयार करेल. हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.राज्यातील तरुणांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन विशेष विकास प्रकल्प तयार करणे, शासनाला सूचना करणे हे महत्वपूर्ण कार्य ही समिती करेल. राज्यस्तरीय दर्जा प्राप्त समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून त्याना युवकांच्या विकासकरिता शासनाला आराखड़ा तथा सूचना, धोरणाबाबत सूचना सादर करता येणार आहे. विशेष म्हणजे ही समिती दर्जा प्राप्त असून समितीचे अध्यक्ष खुद्द राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री दत्त भरणे हे आहेत. या समितीचा थेट महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागांशी संपर्क येणार असून या विभागांमध्ये युवा विकासाबाबत समन्वय साधण्याचे कार्य ही समिती करणार आहे. डॉ. मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रातील विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या 20 ते 25 वर्षपासून केले आहे. युवकांमधे राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया सह सार्क देशात युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा सदेश दिला आहे. डॉ गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीला राज्यपातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आशा प्रकारच्या समितीसाठी अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे ते सर्वात कमी वयाचे युवक आहेत. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या विशेष निवड़ीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राज्य पातळीवर झळकले आहे. त्यांच्या या निवड़ीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री दत्त भरणे, खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,डॉ नितीन धांडे, रविराज देशमुख, लेडी गव्हर्नर कमलताई गवई, कुलगुरु डॉ. मिलिंद बाराहाते , डॉ प्रदीप दंदे,रामेश्वर अभ्यंकर मंगेश मनोहरे,प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, संपादक विजय गायकवाड,डॉ.नितीन कोळी,डॉ. प्रफुल्ल गवई,बिभिशण जाधव,आनंद शिंदे,डॉ. भीमराव वाघमारे, डॉ.नरेशचंद्र काठोळे, शिवाजी डोंगरे, गौतम वानखड़े,मंगेश मनोहरे, डॉ. कुणाल इंगळे, बाळाधन गावंडे, नरेंद्र गुलदेवकर मिथिल कळबे, अमित तायडे,प्रेमकुमार जवंजाल,निलेश दाभने,विशुद्धानंद जवंजाळ, क्रांतिभूषण खडसे यांनी त्यांचे अभिनंदन केले .पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राज्य पातळीवर झळकले आहे.