नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
शहरापेक्षा ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम जोमात राबविली जात असली तरी गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता शासनाने निर्मलभारत तसेच स्वच्छता मोहिम व स्वच्छता अभियान सुरु केले आहेत. याअभियानाचा एक भाग म्हणून शासनाने स्वच्छ भारत मिशन ही मोहिम आता सुरु केली आहे.
मात्र अनेक ग्राम पंचायतीचे स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने स्वच्छता मोहिमेची गती मंदावली आहे. याकडे मात्र ग्रा. पं. प्रशासनाने लक्ष देणे आता तेवढेच गरजेचे आहे. तरच स्वच्छता मोहिमेचा उद्देश सफल होणार असल्याचे बोलले जात आहे.शासनाने स्वच्छतेसाठी यापुर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त गाव व आता स्वच्छ भारत मिशन अभियान सुरु केले आहे. याअभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यच नव्हे तर राज्यातील सर्व गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प ही लवकरच पुर्णत्वास जाणार असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील उघड्यावरील प्रतिनिधीची पद्धत पुर्णपणे बंद करण्याकरिता शौचालय बांधकामावर जोर दिला जात असून प्रत्येक कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम करवून घेणे अत्यावश्यक केले आहे. सदर योजना पारदर्शकतेने लाभविल्यास गावाचा परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य सुद्ध नागरिकांचे अभादित ठेवता येवू शकते. अशाच मानक शासनाचा असला तरी याअभियानाचा मुळ उद्देश ग्रामीण परिसर हे प्रामुख्याने उघड्यावरील शौच विधीमुळे सर्वात जास्त प्रमाणात प्रदूषित असून वेळोवेळी उदभवणाऱ्या सोयीसुविधा रोगराईबर आळा घालून स्वच्छता ठेवायची असेलतर शौचालय बांधून त्यांचा योग्य व नियमित वापर करणे अनिवार्य आहे. परंतु सद्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाचे वास्तव चित्र बघता शौचालय बांधकामाचे चित्र विदारक आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उघड्यावर आजही शौचास जात असल्याचे चित्र पुढे दिसते आहे. यामुळे गावाचा जवळचा परिसर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुचा परिसराचा वापर नागरिक शौचाकरिता दिसून येतात.

शौचालयांची दुरवस्था
स्वच्छता अभियानातंर्गत गावोगावी शौचालय तयार करून देण्यात आले. मात्र, त्या शौचालयांचे बांधकाम होवूनही त्याचा उपयोग करण्यास ग्रामीण भागातील नागरिक टाळत असत. करीता या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. तर अनेक शौचालय मोडकडीस आले आहेत. असे असताना प्रशासनाकडून फक्त शौचालय निर्मितीचा सपाटा लावण्यात आला. त्याचा उपयोग होत आहे कि नाही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक शौचालय गावखेड्यात शोभेची वास्तू ठरले आहे.
समन्वयाअभावी मोहिम अपयशी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी हागणदारीमुक्त गाव करण्याकरिता गुडमॉर्निंग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचे धाडसत्र राबविले. परंतु यामध्ये थोडीफार सुधारणा होवून काही प्रमाणात या मोहिमेला यश आले. मात्र, मोहिमेत सातत्य राहिले नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वचक दाखवून प्रशासनाला सकाळच्या दरम्यान केलेल्या कारवाईमुळे पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही. त्यामुळे यामुळे पुर्वीप्रमाणे उघड्यावर शौचास करणे सुरु झाले. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता आरोग्य व शौचालयाचा अधिकाधिक वापर तसेच व्यवस्थापन व साडपाण्याची व्यवस्थापन आदि विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले मात्र याचा सुद्धा परिणाम पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे स्वच्छता मोहिमेला गती देण्याची गरजही आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण झाली आहे.
