
हिंदु जनजागृती समितीची मागणी
हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना तर्फे राजकमल चौकात आंदोलन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’’ या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली, त्याचप्रमाणे ‘‘खालिद का शिवाजी’’ या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी, अशी मागणी श्री निलेश टवलारे यांनी हिंदु जनजागृती समिती व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजीत आंदोलनात राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.स्थानिक राजकमल चौक येथे दुपारी ४ ते ५.३० दरम्यान आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, आणि रायगडावर महाराजांनी मशिद बांधली होती, असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत.याप्रसंगी श्री रत्नाकर चरडे निषाद सिंह जोध, अभिषेक दिक्षित, एडवोकेट राजेंद्र पांडे यांनी आपले मत व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी धर्मनिष्ठ हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांनी स्वतः आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की, “ *तुर्क फौजेत ठेविले, मग जय कैसा होईल?”* त्यामुळे या चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘ *सेक्युलर* ’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती.
अशा परिस्थितीत ३५% मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे? असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.जर मुस्लिम समाजाला खरेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांना संपवण्याचा चंग बांधला नसता किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(२) आणि भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) नुसार, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे ठरू शकते.” पूर्वीही ‘ *पद्मावत’, ‘जोधा अकबर* ’ या चित्रपटांच्या वेळेस अशाच प्रकारच्या विकृत इतिहासामुळे जनक्षोभ निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.यावेळी श्री सतीश शेंद्रे कला साधना बहुउद्देशीय मंच ,श्री विनय मोटवानी भारत रक्षा मंच,श्री राजेश मिश्रा भारत रक्षा मंच,रत्नाकर चरडे प्रहरी,तुषार वानखडे भाजप ,रश्मी आशिष गांधी हिंदू जागरण,श्री निषाद सिंह जोध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री अभिषेक दीक्षित श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तान,एडवोकेट राजेंद्र पांडे विश्वस्त आंबादेवी संस्थान,भाऊ रोशनी अनिल वाकडे बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष ,सौ वंदना इंगोले ओबीसी मोर्चा अध्यक्ष बीजेपी,सतनाम कौर हुड्डा , महिला मोर्चा उपाध्यक्ष अमरावती शहर भाजप, श्री प्रदीप ठोसर तालुका प्रतिनिधी ,श्री पुंजाराम नेमाडे अध्यक्ष श्री विठोबा संस्थान सावंगा विठोबा,श्री लक्ष्मणराव राठोड श्री विठोबा संस्थान सावंगा विठोबा,सौ गीता बोज्जे उपस्थित होते.