
भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणचे आयोजन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतर सुद्धा आम्हाला पन्नास वर्षांपूर्वी एक आणखी स्वातंत्र्य लढा उभारावा लागला. इंग्रजानंतर इंदिरा गांधी यांनी स्वतः च्या स्वार्थापायी भारत देशावर आणीबाणी लादली. त्या विरुद्ध भारतीय जनतेला एक स्वातंत्र्य युद्ध पुन्हा लढावे लागले असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांनी आणीबाणीचे पन्नास वर्ष या कर्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.भारतीय जनता पार्टी अमरावती ( मोर्शी) जिल्हा ग्रामीण च्या वतीने जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ कार्यालयात दि २५ जून रोजी आणिबाणीच्या ५० व्या वर्षाचे स्मरण करून निषेध करण्यात आला. भारतीय संविधानाची हत्या इंदिरा गांधी यांनी करून देशावर आणिबाणी लादली होती आणि दरम्यान नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवून लाखो लोकांना तुरूंगात डांबले होते.आणीबाणीचे पन्नास वर्ष या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख वक्ते जयंत डेहनकर प्रदेश सचिव भाजपा यांनी आपल्या धारदार वाणीतून सर्वंकष काळा इतिहास मांडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिना पाठक तर ज्येष्ठ आणीबाणील सेनानी मधुसूदन उमेकर तथा माजी मंत्री प्रविण पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा संयोजक तात्यासाहेब मेश्राम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मंचावर सहसंयोजक योगेश्वर खासबागे, सहसंयोजक प्रा सुमित तट्टे, अनिता तिखीले, वर्षा गाडगे, प्रा सुमित पवार, विवेक गुल्हाने, डॉ प्रकाश कणेर, प्रा सुखदेव पवार, दिनेश वानखडे,मामासाहेब निर्मळ, अजिंक्य वानखडे उपस्थित होते.यावेळी आणिबाणी विरूद्ध सत्याग्रह करणारे व दरम्यान कैद भोगलेल्या सत्याग्रहींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मधुसूदन उमेकर, अशोक सांगोले, गंगाधर मारुडकर, साहेबराव कडूकार, अरूण जोशी, मुकुंदराव रहाटगावकर, नंदकिशोर मिश्रा,यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्र्यंबकराव निस्ताने यांच्या पश्चात संगीता राजेश्वर निस्ताने तर ज्ञानेश्वर वाघ यांच्या पश्चात रजनी वाघ यांनी सत्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण राऊत, सुत्रसंचलन दिनकर सुंदरकर यांनी केले तर धनंजय उमप यांनी आभार मानले.