
शेतकऱ्यांना करण्यात आले मार्गदर्शन.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
विठ्ठल मंदिर कोठोडा येथे कृषी विभाग अन्तर्गत तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक पि यू लाडके यांनी खरीप हंगाम गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर गाव बैठकीमध्ये घरगुती सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक , बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक , कापूस पीक कीड रोग व्यवस्थापन , खताचा समतोल वापर, अग्रिस्टग योजना , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजना अशा विविध विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच यावर्षी घरगुती सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करून शंभर टक्के बियाणे बीजप्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावी असे आवाहन कृषी सहाय्यक लाडके यांनी सर्व शेतकरी बांधव उपस्थित शेतकरी बांधवांना केले. सदर खरिप हंगाम मोहीम ही मंडळ कृषि अधिकारी अनिल वानखडे व कृषी पर्यवेक्षक उदय गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून सदर गाव बैठकीस गावातील मोठ्या प्रमानावर शेतकरी बांधव उपस्थित होते.