
३००० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण
उसळगव्हाण (देवगाव उपकेंद्र) आणि जळगाव मंगरूळ (मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र) प्रकल्पातून निर्मिती होणार ६ मेगावॅट वीज
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यातील उसळगव्हाण (देवगाव उपकेंद्र) आणि जळगाव मंगरूळ (मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र) हे पहिले दोन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रत्येकी ३ मेगावॅट क्षमतेच्या या दोन सौर प्रकल्पामुळे उपकेंद्र परिसरातील ३ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील ३ मेगावॅट क्षमता असलेला उसळगव्हाण (देवगाव) सौर प्रकल्प हा १५ एकर शासकीय जमिनीवर तयार करण्यात आला असून या प्रकल्पातून तयार होणारी वीज ३३ केव्ही देवगाव उपकेंद्राला जोडण्यात आली आहे. त्यामुळे या उपकेंद्रातून निघणाऱ्या कृषी वाहिनीवरील पंधराशे शेतकऱ्यांना दिवसा विजेची सोय उपलब्ध झाली आहे.
तसेच जळगाव मंगरूळ येथील सौर प्रकल्पाची क्षमताही ३ मेगावॅट असून १५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज ३३ केव्ही मंगरूळ दस्तगीर उपकेंद्राला जोडण्यात आलेली असून यामुळे ३३ केव्ही मंगरूळ दस्तगीर उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या जवळपास १५०० शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा, अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा शक्य होणार आहे. ऊर्जा सचिव श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यात या योजनेला गती दिली आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ८४० एकर शासकीय जमीनीचे अधीग्रहन करण्यात आले आहे. या जमीनिवर ४४ ठिकाणी ४१ उपकेंद्रासाठी विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून या प्रकल्पातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे.
झाडांची तोड जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्यामध्ये वन विभागाच्या सुद्धा अधिकारी कर्मचारी सामील असल्याचे निदर्शनात येत आहे मोठमोठे लिंबाचे व सावली देणारे झाड मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण दिसत आहे