
भातकूली येथे निघाली भव्य तिरंगा रॅली
भातकुली / तालुका प्रतिनिधी
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.
भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज भातकुली येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा बस स्टँड ते मुख्य चौक या मार्गाने पार पडली.
“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” ” सुन ले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान ” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी मिलींद बांबल, सतिश आठवले, राजेश आखेगावकर,दिनेश खेडकर, म.सादिक,बाळासाहेब भजभुजे,शाम लाठी,,राजू ढोके, संजय बांबल, प्रणव इंगळे, शैलेश खांडेकर, अक्षय जानवाडे,नंदू काळे, सागर ठाकरे, करण मुंदडा, शिवा जाधव,निवृत्ती चतृभूज, विशाल मानकर,शरद कोलटेके,हरिष हजारे,विशाल राऊत,विनोद बाभुलकर, उज्वल अंबाडे,नरसिंग बंग , राजेश धर्माळे , पवण दंदे,ऋतिक बनसोड,अमोल रेहपाडे,राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.