
अमरावती- (प्रतिनिधी)-
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कठोर पावले उचलली आहेत. शैक्षणिक वर्षात देशभरातील कोणत्याही उच्च शिक्षणसंस्थेत अशा घटना घडू नयेत, यासाठी ‘यूजीसी’ने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी देशाच्या प्रत्येक विद्यापीठात अँटी रॅगिंग समिती स्थापन करणे अनिवार्य असल्याने या समितीमध्ये मा कुलगुरूंच्यावतीने भारत सरकारच्या युवा कार्य और खेळ मंत्रालयाच्या अधीन नेहरू युवा केंद्र संघटनेच्या राज्यस्तरीय दर्जा प्राप्त समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड करण्यात आली आहे.यापूर्वी देखील त्यांनी विद्यापीठात राजपाल नामीत सिनेट सदस्य म्हणून उत्कृस्ट काम केले हे विशेष.
विशेष म्हणजे ही समिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीप्रमाणे काम करत असून राजिओजिला थांबविण्याबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करणारी ही महत्वाची समिती आहे त्यांच्या या विशेष निवडीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे.
नियुक्ती पत्र मिळताच विद्यापिठातील युवकांसाठी रॅगिंग विरोधी अभियान -उपक्रम राबविणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.रॅगिंगविरोधात जनजागृती करण्यासाठी अँटी-रॅगिंग कार्यशाळा, परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच रॅगिंग रोखण्यासाठी धोक्याच्या घंटा बसवणे, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, विद्यार्थ्यांमधील रॅगिंग करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या परिणामांची कल्पना देणे असे उपक्रम शैक्षणिक संस्थांनी या समितीच्या माध्यमातून हाती घ्यायचे आहेत.डॉ. मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रातील विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या 20 ते 25 वर्षपासून केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया सह सार्क देशात युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा सदेश दिला आहे. अशा प्रकारच्या समितीसाठी डॉ गवई यांची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे.त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या विशेष निवड़ीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पूर्वी देखील त्यांनी विद्यापीठात राजपाल नामीत सिनेट सदस्य म्हणून उत्कृस्ट काम केले असून त्याच्या कारगीर्दीक अनेक विधार्थी हिताचे निर्णय घेण्यात आले.
त्यांच्या या निवड़ीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, खासदार बळवंत वानखडे,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा, लेडी गव्हर्नर कमलताई गवई, डॉ राजेंद्र गवई, कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते , डॉ नितीन धांडे, रविराज देशमुख रामेश्वर अभ्यंकर मंगेश मनोहरे,प्रा. दिनेश सूर्यवंशी, राजू ननावरे, डेटाराम मनोजा, विशुद्धानंद जवंजाळ, क्रांतिभूषण खडसे डॉ.नितीन कोळी,डॉ. प्रफुल्ल गवई,बिभिशण जाधव,डॉ. भीमराव वाघमारे, डॉ.नरेशचंद्र काठोळे, शिवाजी डोंगरे, गौतम वानखड़े,डॉ. कुणाल इंगले, बाळाधन गावंडे, नरेंद्र गुलदेवकर मिथिल कळबे, अमित तायडे,प्रेमकुमार जवंजाल,निलेश दाभने यांनी त्यांचे अभिनंदन केले .