
बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात ठेवण्यासाठी खोट्या तक्रारींचा आधार
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे माजी सैनिक के. केलू कुट्टी यांना सिलिंग मध्ये मिळालेली जमीन येथील भूमाफिया विजय बाबुराव खंडार व त्याचे साथीदार हे बेकायदेशीरपणे जमीन ताब्यात ठेवण्यासाठी माजी सैनिकाच्या मुलीला व परिवाराला धमक्या देऊन, खोट्या तक्रारी करून, बळजबरीने ताब्यात ठेवण्यासाठी छळ करत आहे. माजी सैनिक के. केलू कुट्टी यांची एकमेव वारस श्रीमती श्रीलता रवींद्रनाथ यकोडशेरी (वय 67वर्षे) धंदा, घरकाम राहणार महाकाली कॉलनी चंद्रपूर, तालुका जिल्हा चंद्रपूर यांना वारसा हक्काने कायदेशीर फेरफार करून त्यांच्या नावे अधिकृत सातबारा मिळाला आहे.मात्र येथील भूमाफिया विजय खंडार हा त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने “माझे वडील तुझ्या वडिलाकडून शेती करत होते” हा भाना सांगून ही जमीन हडप करण्यासाठी सातत्याने त्यांना धमक्या देत आहे.जमीन मालक श्रीलता कोडशेरी व विजय खंडार यांचे वडील आज हयात नसून त्यांच्या मधील व्यवहाराची कोणतीही कायदेशीर नोंद शासनाच्या दस्तऐवजात कुठेही उपलब्ध नाही. अथवा असा कोणताही पुरावा विजय खंडारे यांच्याकडे उपलब्ध नसताना ते जाणीवपूर्वक शेतावर कब्जा ठेवण्यासाठी व खंडणी उकळण्याच्या उद्देशाने शासन प्रशासनाकडे खोट्या तक्रारीचा सहारा घेत आहे व न्यायालयात खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न करून न्यायालयाचा वेळ वाया घालण्याचा प्रयत्न करत आहे.विजय खंडार यांच्याकडे अनेक शेतांचा बेकायदेशीरपणे कब्जा असून जमिनी हडप करण्याचा त्यांचा धंदा आहे.नांदगाव खंडेश्वर येथील संजय मंडवधरे व शिरपूर येथील शेतकरी जगदीश नामदेवराव रोकडे यांना तीन वर्षाकरिता श्रीलता कोडशेरी यांनी रीतसर नोटरी करून देखभालीसाठी व वाहिती साठी शेत दिलेले आहे. ते जमीन तयार करण्यासाठी शेतामध्ये गेले असता विजय खंडार याने अनेक वेळा गुंडांच्या सहाय्याने रोखण्याचा प्रयत्न केला व जातीय वाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
विजय बाबुराव खंडार (वय 58 वर्षे)
दर्शन विजय खंडार (वय २५ वर्षे)
कपिल गोपाळराव खंडार(वय 28 वर्षे)
तिघेही राहणार शिरपूर यांनी ट्रॅक्टर अडवून शेताची वाही करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.विजय खंडार बेकायदेशीरपणे,बळजबरीने ताब्यात ठेवण्याच्या व खंडणी मागण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना व स्थानिक पोलीस प्रशासनाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,श्रीमती श्रीलता रवींद्रनाथ कोडशेरी यांची मौजा शिरपूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे शेत सर्वे क्रमांक 90/3/ड एकूण आराजी 2.08 हे.आर खाते क्रमांक 313 ही वडिलोपार्जित शेत जमीन वारसा हक्कानुसार संबंधित तलाठी रेकॉर्डवर नोंद असून आज रोजी त्यांचे मालकी ताबा वहिवाटीत आहे.श्रीलता कोडशेरी यांनी कायदेशीरपणे संजय मंडवधरे व जगदीश रोकडे यांना दिनांक 13/3/2025 रोजी श्रीमती श्रीलता रवींद्रनाथ कोडशेरी यांनी तीन वर्षाकरिता भाडे चिट्ठीचा करारनामा नोटरी करून कसण्याकरता ही जमीन त्यांना दिली आहे.विजय खंडारचा कोणताही कायदेशीर संबंध नसताना जमीन बळजबरीने ताब्यात ठेवण्याच्या उद्देशाने व खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्यांनी दिनांक 12/4/2025 रोजी ते जमीन करण्यासाठी शेतामध्ये गेले असता त्यांना अटकाव केला व जीवे मारण्याची धमकी देऊन आणि जातियवाचक शिवीगाळ करून जमीन कसण्यास मज्जाव केला. याप्रकरणी प्रकरणाची फिर्याद दिनांक 24/4/ 2025 रोजी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन मध्ये सादर करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी विजय खंडार विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.विजय खंडारे यांचा दुसऱ्याच्या जमिनी बळजबरीने व बेकायदेशीर मार्गाने ताब्यात ठेवण्याचा व्यवसाय असून शिरपूर येथील अनेक जमिनीवर त्यांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे व कब्जा केलेल्या जमिनी बेकायदेशीरपणे दुसऱ्यांना भाडेपट्ट्याने उकळण्याचा धंदा करत आहे.विजय खंडार कडे कोणतीही कायदेशीर मालकी हक्क नसताना शेतमालक व भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये खोट्या तक्रारी करून धमक्या देत आहे व खंडणी वसूल करण्यासाठी सर्व आटापिटा केला जात आहे.श्रीमती श्रीलता कोडशेरी यांचे वडील हे माजी सैनिक होते व ती त्यांची एकुलती एक वारस आहे. तसेच शासनाच्या रेकॉर्डनुसार फेरफार घेऊन ही जमीन अधिकृतपणे त्यांच्या मालकीची आहे. त्याबाबतचे सर्व दस्तावेज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.विजय खंडार हा या शेताचे अधिकृत मालक श्रीलता कोडशेरी यांना धमक्या देत आहे व दहशत पसरवून कायद्याचे उल्लंघन करण्याचा व कायदा हातात घेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याचे विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी श्रीलता कोडशेरी यांनी केली आहे.