
प्रत्येक महिन्याच्या शेवटचा रविवारला मिलिंद बांबल शहरातील वेगवेगळ्या भागात करतात आयोजन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाने उंचावले असे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वी कामगिरी नंतर आज रविवार 25 मे च्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर येथील जुगलकिशोर टावरी यांच्या निवासस्थानी केले होते आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद बांबल हे शहरातील विवीध भागात तसेच ग्रामीण भागात सुद्धा करतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवतात व जनतेच्या काही समस्या असल्यास त्या सोडविन्यासाठी प्रयत्न करतात त्याच अनुषंगाने आज रविवारला सकाळी 11 वाजता “मन कि बात “कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या महायुती सरकारने देशहिताच्या जनकल्याणाच्या अनेक चांगल्या योजना सुरू केल्या तसेच सेवा , सुशासन , गरीबकल्याणच्या कार्यासोबतच शेतकरी ,महिला , युवक यांच्यासाठी खूप चांगले काम केले ऑपरेशन सिंदूर यशस्वी रीत्या राबवून अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या त्यांचे अनेक सेंटर उध्वस्त केले.आणि जगाला दाखवून दिले कि आम्ही कोणाला छेडत नाही आणी कोणी आम्हाला छेडले तर त्याला भारत सोडत नाही त्यांची संपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा , सरक्षंण मंत्री राजनाथ सिंह तसेच भारतीय लष्कर ,भारतीय नौदल ,भारतीय वायुदल या तिन्ही सैन्य दलाचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल,जुगलकिशोर टावरी , दीपक अनासाने , लक्षमणराव धानोरकर , अनिल काळे ,दीपक बांबल , गजानन गतफणे , संतोष चांडक , राकेश बुंदेले ,पनु गुल्हाने , राहुल धर्माळे , अभिजीत रौरासे , प्रवीण तेलंगे , मनोज राऊत , रोशनउमक , अविनाश मालोदे , पंजाबराव बुढाळकर , मनोज जावरकर , अमित इंगळे , सचिन आलाटकर , सुनील तेलंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.