
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशानुसार येत्या काही महिन्यात संम्पन्न होणार आहे. त्याअनुषंगाने मा. रमेशजी बंग माजी मंत्री तथा अमरावती ग्रामीण जिल्हा निरीक्षक व अनिल जळमकर जिल्हाध्यक्ष अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक शासकीय विश्रामगृह , नांदगांव खंडेश्वर याठिकाणी संपन्न झाली.यावेळी तालुक्यातील एकंदरीत राजकीय परिस्थितीची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून पक्ष निरीक्षकांनी घेतली. होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात लढणीन्यात यावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. यावेळी रमेशजी बंग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता बुथनिहाय बांधणी करून तसा अहवाल पक्षाकडे येत्या दीड महिन्यात सादर करावा असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी सचिन रिठे तालुकाध्यक्ष, शरद देवरणकर, प्रवीण भेंडे किशोर गुलालकरी, साजिदभाई, मनोज गावंडे, अमोल शिरभाते, पंकज ठाकरे, फिरोज लाद्धानी, सौ. जयश्री बावणे, सौ. कस्तुरे, हितेश शेळके, मोहन चोरे, राहुल भाकरे, प्रथमेश भगत, देवराव मोहोड, रवी पडोळे, चंदू बावणे, धनराज रावेकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते.