
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
दि. 18 ते २० जून रोजी रात्री झालेल्या पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतीकामांना चागलाच वेग आला असून शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला जोरदार सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनाने सुखद वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने खुलले आहे.शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलाच्या साहाय्याने सरे पाडणे, फुल्या पाडणे या प्रक्रियांना सुरुवात करत आहेत. या वर्षी नव्या जोमाने शेतकरी शेती कामात व्यस्त झाले आहेत.कपाशी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे दर्जेदार बियाण्यांना पसंती दिली आहे. यामध्ये अजित कंपनीचे 155 व 199, तुलसी कंपनीची कबड्डी, राशी कंपनीची 659, अंकुर कंपनीचे 3028, तसेच जय किसान कंपनीचे 1116 या वाणांचा समावेश आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पावसामुळे शेतातील माती ओलसर झाल्याने कपाशी लागवडीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी, शेतकरी अत्यंत उत्साहाने शेतात उतरले असून यावर्षी चांगले उत्पन्न व बाजारभाव मिळेल, अशी आशा व्यक्त करत आहे.शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात होताच मंगरूळ चव्हाळा,धामक,सालोड,शिंगणापूर,टीमटाळा,खिरसाना, निरसाना,सावनेर,मोखड,आणि बहुतांश भागात आणि परिसरात शेती कार्य जोमात सुरू झाले आहे. शेतकरी वर्ग देवाकडे यंदा चांगल्या उत्पादनाची आणि समाधानकारक दर मिळण्याची प्रार्थना करत आहे.पावसाच्या आगमनानंतर शेतात कपाशीची लागवड करताना शेतकरी बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने सारे पाडताना दिसत आहेत. काही ठिकाणी कुटुंबातील महिला आणि तरुणही या कामात उतरल्यानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. शेताच्या कडेला उभे असलेले हिरवे डोंगर आणि आकाशात पसरलेले ढग, या पार्श्वभूमीवर काम करणारे शेतकरी हे दृश्य अतिशय प्रेरणादायक वाटते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. अखेर 18 ते २० तारखेला पाऊस झाला आणि लगेचच कपाशीची लागव ड सुरू केली. यंदा अजित 155 आणि तुलसी कबड्डी हे वाण वापरत आहोत. चांगलं उत्पादन होईल अशी आशा आहे.
अनिकेत शिरभाते :- शेतकरी,मंगरूळ चव्हाळा
गेल्यावर्षी पावसामुळे शेतीच आणि पिकांचं खूप नुकसान झालं होतं. पण लयंदा सुरुवात चांगली आहे. आम्ही जय किसान 1116 लावलाय, पाऊस वेळेवर आला तर चांगलं उत्पन्न मिळेल.
प्रवीण चौधरी :- शेतकरी,धामक
👌👍