
मराठी तर नाहीच पण हिंदी भाषिक ही नसलेले हे भिकारी कुठले व कोण
आर्णी / रफीक सरकार
वेगळीच भाषा व पेहराव आसलेल्या भिकाऱ्यांनी आर्णी शहरातील माहूर रोडवरील 35दुकानदारांच्या नाकिंनव आणले आहे. मराठी तर नाहीच पण हिंदी भाषिक ही नसलेले हे भिकारी कुठले व कोण आहेत याचा छडा लावणे गरजेचे झाले आहे. सदर भिकारी माणसे बाया व मुल नशेडी म्हणजे नशा करणारे असून यांच्या रोजच्या जीवघेण्या भांडणामुळे आर्णी शहराचा कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची वास्तविक परिस्थिती कोणत्याही क्षणी येथे पाहता येते. यांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असल्याने हा विषय आर्णीकरांसाठी प्रचंड चिंतेचा झाला आहे. येथील 35 दुकानदारांनी सह्यांची तक्रार पोलीस स्टेशन व नगर परिषद कडे दिली असूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोप दुकानदारांनी बोलून दाखवला आहे.
वेगळीच भाषा व पेहराव आसलेले असंख्य भिकारी, आर्णी शहरातील माहूर व दिग्रस् रोडलगत आसलेल्या शंकरपट मैदानात व हिर टॉकीज च्या लेआऊट मध्ये तात्पुरते कापडी झोपड्या उभारून राहतात. पावसाळ्यात व ईतर वेळीही हे असंख्य भिकारी परिवार,येथील दुकानदारांच्या दुकानासमोर सामूहिक रित्या झोपतात. अश्यावेळी ते दारू, गांजा, पंचर काढण्याचे सोलेशन ट्यूब यांचा भरपूर नशा करतात. माणसे तर सोडाच पण बाया व लहान मुले सुद्धा नशा करतात. त्यामुळे यांचे नेहमीच जीवघेणे भांडण होतात. या भांडण तंट्यांचा त्रास छत्रपती शिवाजी चौक ते दर्गा पर्यंत च्या सर्वच दुकानदारांना व नागरीकांना आहे. दुकानासमोर हे भिकारी दररोज घाण करतात.
त्यामुळे ही रोजची डोकेदुखी थांबवावी व या त्रासदायक भिकाऱ्यांना आर्णी शहरातून कायम स्वरुपी हद्दपार करावे अशी मागणी व तक्रार नागरिकांनी पोलीस स्टेशन व नगर परिषद कडे केली आहे.
वास्तविक पाहता पोलीस यंत्रने दफ्तरी अश्या लोकांचा रेकॉर्ड असणे गरजेचे आहे. तत्कालीन ठाणेदार पितांबर जाधव यांनी अश्या लोकांची माहिती घेऊन त्यांना आर्णी शहरातून हाकलून लावले होते. सध्या कार्यरत ठाणेदार याबाबत उदासीन दिसत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
येथील माऊली ऑटोमोबाईल चे अभिषेक नीलापवार, यश ऑटोमोबाईल चे अशोक येरावर, हिर टॉकीज चे मॅनेजर अमीन कासम सय्यद यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.