
रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी, संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वाढोणा रामनाथ ते तारखेडा रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून भूमिपूजन झाले असून अजून पर्यंत रस्त्या सुधारण्याच्या कामाला गती आली नसून गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असुन वाढोणा रामनाथ ते तारखेडा रस्ता नेमका कुणाच्या घशात गेला असा प्रश्न सर्व सामान्य लोकांना पडला असून जर या रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा येथील शेतकरी, विद्यार्थी, वाहन चालक यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले वाढोणा रामनाथ ते तारखेडा या रस्त्याची सध्याची स्थिती अतिशय गंभीर झाल्याने या रस्त्याने अनेक अपघात झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दैनंदिन अवस्था बिकट झाली असून ग्रामस्थ वैतागले आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने बडनेरा येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आंबेकर साहेब यांना येथील नागरिकांनी या रस्त्याची माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तर देऊन मोकळे होतात व काही तांत्रिक अडचण येत आहे असे उत्तर देतात. नेमकी तांत्रिक अडचण कोणती हे सर्वसामान्यांना समजायला मार्ग नाही? वाढोणा रामनाथ या गावात आजूबाजूच्या गावासाठी मोठी बाजारपेठ असून येथे जि.प. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण कला महाविद्यालय असून या रस्त्याने वीरगव्हाण, लोणी, निंभा, मंगटपूर,तारखेडा या गावातील विद्यार्थी व शेतकरी यांची वर्दळ असते.
या रस्त्याने अनेक अपघात झाले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.हा रस्ता १ कि.मी. अंदाजे खर्च ९५ लक्ष रुपये मंजूरात असून हा रस्ता अर्थसंकल्पीय अंतर्गत २०२३ सा. क्र.२/०१ ते ३/०० सुधारणा करणे यांचे भूमिपूजन गेल्या दोन वर्षापासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार श्री प्रताप दादा अडसड व वर्धा मतदार संघाचे माजी खासदार श्री रामदास तडस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला असून अजून पर्यंत रस्त्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. येणारा काळ पावसाचा असुन रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास गणेश माटोडे, प्रवीण जिरापुरे, अमोल इंगळे, संतोष जळके, विनोदी इंगळे, शेख आसिफ, संतोष गुल्हाने, दिनेश राजगुरे, शेख इब्राहिम, विष्णुपंत तीरमारे, सिताराम कंटाळे, ओंकार माटोडे, दीपक शहाडे, महेंद्र माटोडे, गजानन बोरकर, राजू कांडगे, गजानन श्रीराव, धनराज ठवकर, मोहन इलमे,संजय तीरमारे, विठ्ठल माटोडे, प्रफुल मानके, इत्यादी गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.