
डॉ. रवींद्र नैताम वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागपूर यांचे शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
वाढोणा रामनाथ येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत होण्याकरिता विशेष शेतीवर भर देत असता संपूर्ण भारतभर ” विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप पूर्व मोहीम भारत कृषी जागरण यात्रा चे आयोजन दि.२९ मे ते १२ जून या कालावधीत संपूर्ण देशात राबविण्यात येत असून, विकसित भारत कृषी संकल्प अभियान वाढोणा रामनाथ येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाकरिता गावच्या प्रथम नागरिक म्हणून सौ. सविता विष्णुपंत तिरमारे ह्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तसेच दुर्गापुर कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मुख्य मार्गदर्शक डॉ. रवींद्र नैताम वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागपूर व डॉ. हर्षद ठाकूर ( के. व्ही.के.) पी. एच. महल्ले साहेब हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच माजी उपसरपंच अमोल गुल्हाने, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन जकवार मंचावर उपस्थित होते. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेतकऱ्यांनी शब्द सुमनाने केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये पी. एच. महल्ले साहेब यांनी कार्यक्रमाचे रुपरेषा समजावून सांगितली यानंतर डॉ. रवींद्र नैताम वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागपूर यांनी येणारा खरीप हंगाम २०२५ बद्दल शेतकऱ्यांना शेती विषयक संपूर्ण माहिती दिली. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या घटक कमी जास्त आहे हे तपासून घ्यावे व त्या प्रकारे खताचे नियोजन करावे व वारंनवार एकच एक पीक न घेता आपल्या शेतामध्ये पिकांमध्ये फेरफार करून उत्पन्न कशाप्रकारे वाढ होइल हे समजावून सांगितले. यानंतर डॉ. हर्षद ठाकूर साहेब यांनी शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनातून येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनची बी.बी.एफ. पद्धत व पट्टा पद्धत त्यांचे शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर राहील हे सांगितले. तसेच विविध कंपनीचे सोयाबीन, तुर, कापूस हे वाण शेतकऱ्यांना कशाप्रकारे पेरणी योग्य राहील यांच्या संपूर्ण माहिती दिली. बियाण्यांची बीज प्रक्रिया केली असता शेतकऱ्यांना उत्पन्नात कशी भर पडेल यांची उत्कृष्ट माहिती आपल्या मार्गदर्शनात दिली. तसेच शेती विषय शासकीय योजनेची माहिती दिली या कार्यक्रमाकरिता कृषी अधिकारी श्री.नारायण नागरे, श्री एस. आर. होरे, श्री.ए.पी.माहुरे कृषी मित्र शैलेश गौतम, संदीप जीरापूरे, रामचंद्र कावलकार, प्रकाश माटोडे, दिलीप येवले, सुनील वडवाले, प्रमोद जकवार, फिरोज पठाण, ओंकार माटोडे, रामेश्वर बलखंडे, दिवाकर गायधनी, गजानन दुबे, वैभव ठवकर, गणेश चौधरी, गजानन गुल्हाने, अमोल गायधनी, पुरुषोत्तम शंकरपुरे, रामदास तिरमारे, गजानन कुलकर्णी, प्रफुल बनारसे, दीपक कडव, एशिनाथ माटोडे नितीन येवले, सुनील गायधनी, जगदीश शबे इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माटोडे तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी श्री नारायण नागरे साहेब यांनी केले.