
सावता परीषद अमरावती तर्फे राणी लक्ष्मीबाई पुण्यतीथी संपन्न
अमरावती प्रतिनीधी / रामचंद्र मुंदाने
विरांगणा महाराणी राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी समता परिषद अमरावती व साईबाबा भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश वि. नागपूरे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अमरावती हे होते. तर ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी विश्व वारकरी सेना अध्यक्ष हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते . सर्वप्रथम प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विरांगणा महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले . प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या छोटेखाली भाषणात विरांगणा महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबनराव चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक मुरलीधर चव्हाण बंजारा कवी यांनी केले . विक्रांत चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले . या कार्यक्रमाला प्रकाश लुंगे, जनार्दन पवार , मधुकर राऊत, मुरलीधर चौधरी, पंजाब चुडे, रामदास राठोड बंजारा कवी, चंद्रशेखर भोंबे , दीपक पुरी , रामकृष्ण कोल्हे ,देविदास काळमेघ ,संजय तऱ्हाळ, उषाताई चव्हाण ,छायाताई मुंदाने ,प्रकाश भाम्बुरकर , देवश्री चव्हाण, प्रदीप वानखडे, राजू चुडे ,विनोद गाढवे ,कलावती नांदणे ,शुभम नरसिंगकर ,अशोक पागृत, अश्विन बोरकर , गणेश इंगळे, अनिल राऊत ,सुनील देशमुख, भावेश धाकडे ,कुसुमताई नागापुरे ,अर्चना देशमुख, कल्पना नागापुरे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.