
विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने भव्य आंदोलन
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेन्द्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शेतकऱ्यचा 7/12 कोरा..करण्याचे वचन दिले होते.मात्र आश्वासन पूर्ण सरकार करत नाही म्हणून बच्चूभाऊ कडू आणि सर्व शेतकरी यांनी कर्जमाफी करता आज चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि आपला सरकार विरोधात निषेध नोंदविला। कृषिमंत्री विधानसभेत जंगली रमी खेळतो मात्र शेतकऱयाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो.फ्री स्टाईल मारामारी आमदार करतात आणी इकडे दररोज शेतकरी मरतो आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही हे चित्र दिसते आहे.हमीभावाला विसर पडलाय सोबत शेती प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही.आयात निर्यात धोरण जाणीवपूर्वक चुकीचे घेतल्या जाते त्यामुळे सर्व भार हा शेतकऱ्यावर पडला आहे.gst चा मारा त्याने सुद्धा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाते, तेव्हा शेतकरी शेतमजूर हे सर्व डॉ.पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या जन्मगाव पापळ एकत्र आले, शेतकरी नेते मा. श्री. सिताराम कनठाडे श्री छोटू भाऊ मुदे मा. श्री. विष्णुपंत तिरमारे , नुरू भाई विजय भाऊ अजबले शरद बोदडे रवींद्र चपटे शंकरराव अजबले अजय घरडे , मनोहर तिवाडे दिलीप निवारे अशोक कराडे अमोल रोहणकर सागर पाटील हरीश शिदे गजानन खरडकर बाळासाहेब कणशे राहुल बोदडे भूषण गेडाम हर्षानंद घरडे आमित पानतावने बबलू शिवणकर,हरीश बोरकर महेन्द्रा बोरकर, वैभव शिंदे आणि व्यापारी संघटनेचा जाहीर पाठिंबा व वाढोणा रामनाथ पापळ,काजना राजना हिवरा मु.पिंपरी गावांमधील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.