
शहरातील विविध विषायांवर केली चर्चा
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महानगरपालिके मध्ये नुकताच रुजु झालेल्या आयुक्त मा.सौ. सौम्या शर्मा यांचे मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वागत केले तसेच अंबापेठ – गौरक्षण प्रभागातील विविध समस्यांवर चर्चा केली आता पावसामुळे डेंग्यू , मलेरिया चे प्रमाण मोठ्या प्रमाणात शहरात वाढते त्यामुळे प्रभागात नियमित साफसफाई , कचरा उचलणे , मच्छर प्रतिबंधक फवारणी झाली पाहिजे याकरिता आयुक्तांनी कडक आदेश द्यावे तसेच पन्नालालनगर मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांचा येण्याजाण्याचा पुलाजवळील पन्नालालनगर शॉर्टकट रस्ता बंद झाला आहे शेकडो नागरिक , महिला , जेष्ठ नागरीक यांना जाण्यायेण्यासाठी मुख्य रस्ता आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येवून पडु शकतो व एखादी मोठी दुर्घटना होउन जीवितहानी होण्याची शक्यता आहे नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठिल नागरिकांना अक्षरश्या जिव मुठीत घेवून राहावे लागते मिलिंद बांबल मनपा स्थायी समिती सभापती (सन :- 2016-17 ) असतांना शहरातील सर्व 16 मोठे नाले आणी 18 उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षाभिंती बांधन्यात याव्या यासाठी 375 करोड 67 लाख रुपयाचा D.P.R तयार केला होता यामध्ये स्व.वसंतराव नाईक नगर ते श्रीनाथवाडी मोठा नाला , मारोतीनगर नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम , श्रीनाथ वाडी पुलाचे बांधकाम सोबतच राजापेठ ते पन्नालालनगर ते एच.व्हि.पि.एम पर्यंतचा 1700 मीटर लांबीचा नाला खर्च 44 करोड रुपये याचा सुध्दा समावेश होता सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे नाल्याकाठील राहणारे पवन बागडी , रामेश्वर रौरासे , राठी , शेंडे , गहलोत यांच्या घराच्या मागच्या बाजूच्या भिंती नाल्याच्या पाण्यामुळे पडल्या आहे दोन महिन्या अगोदर पन्नालाल नगर पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी या मागनीसाठी मनपाला निवेदन दिले होते पन काहीच कार्यवाही झाली नव्हती त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होउन जीवितहानी होण्या अगोदर दुरुस्ती करावी यासाठी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले नाल्यात पाणी अत्यंत खराब असून काही ठिकाणी नाल्यात मोठे खड्डे असल्याने पाण्याच्या अंदाज येत नाही सापांची संख्या नाल्यात खूप आहे तरी सुद्धा खचलेल्या रस्तामुळे कोणती जीवितहानी होउ नये याकरिता माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले मिलिंद बांबल यांच्या आंदोलनाची दखल मनपाने घेतली आणी चंदु सोजतीया ते गहलोत यांच्या घरापर्यंत सुरक्षा भिंतीचे काम केले पण त्यासमोरचे गहलोत ते रवी शेंडे यांच्या घरापर्यंत सुरक्षा भिंतीचे काम केले नाही कामासाठी 49लाख रुपये मंजूर केले पन अजून पर्यंत कामाला सुरुवात झाली नाही रस्ता पूर्ण खचला असून केव्हाही दुर्घटना होउन जीवितहानी होण्याची शक्यता आहे दुरुस्ती करणे अती आवश्यक असल्याने माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्त मा. .सौ.सौम्या शर्मा यांची भेट घेवून पन्नालालनगर नाला दुरुस्ती बाबत चर्चा केली तसेच 2016 – 17 ला अमरावती शहराच्या मध्यवस्तीतुन वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणी 18 उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी 375 करोड 67 लक्ष रुपयाचा DPR पुण्याच्या युनिटी कंसल्टंट कंपनी तर्फे तयार करून मनपाने शासनाकडे पाठवला होता तो मंजूर करण्यासाठी त्याचा पाठपुरावा महानगरपालिकेने करावा असी मागणी सुद्धा केली यावेळी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती तसेच “संघर्ष ” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बांबल , दीपक अनासाने , नरेंद्र नांदूरकर , अविनाश माळोदे , निरज खेरडे , रामेश्वर रौरासे , पप्पू गहलोत , रवी शेंडे , मनोज राऊत , प्रवीण तेलंगे , मनोज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते