
पापळ गावातून कर्जमाफी एल्गाराची सुरुवात;
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या एल्गाराला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ या गावातून भव्य प्रारंभ झाला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि याच ठिकाणी एल्गार सभेला प्रारंभ झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
तुपकर यांचा तीव्र हल्लाबोल : “शेतकरी व्हेंटिलेटरवर”
सभेला संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. खुद्द एका मंत्र्यांनीही विधानसभेत हे मान्य केले आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवण्याच्या दिशेने इंग्रजांप्रमाणे दादागिरी आणि दहशतीचे राजकारण करत आहे.”
तुपकर यांनी ठामपणे जाहीर केले की, “शेवटच्या श्वासापर्यंत कर्जमाफीचा लढा चालू ठेवू. राज्यभर कर्जमाफीचा एल्गार उभा करून सरकारला झुकवू.” त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनीही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रमुख मागण्या
या एल्गार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या: संपूर्ण शेतकरी कर्जमाफी त्वरित करावी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावीसरसकट पिकविमा लागू करावा सोयाबीन व कपाशी पिकांना हमीभाव द्यावा एकजुटीचा निर्धार : सर्व पक्षीय पाठिंबा या सभेला क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह विविध पक्षांच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थिती
रविकांत तुपकर,यांचेसह क्रांतिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, लक्ष्मण मोरे, गजानन सावरखे, किरण ठाकरे, सागर दुधाने, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवळी, कपिल पडघन.छोटू मुंदे, विष्णू तिरमारे, शरद बोदडे, विजय अजबले, रमाकांत मुरादे, राजु राऊत, तसेच शेतकरी संघटनेचे सिताराम कंटाळे हे देखील उपस्थित होते.रविकांत तुपकर व प्रहारचे बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनात आम्ही सर्वजण सामील असून, वेळ आल्यास रस्त्यावर उतरून सरकारला उत्तर देऊ.असे यावेळी उपस्थित सर्व वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या सभेचे सूत्रसंचालन संतोष सुरजुसे यांनी केले.सभेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली होती.