माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा
हजारों महिला,पुरूष, मंजूर व शेतकऱ्यांची उपस्थित
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज तालुका व शहर काँग्रेस कमिटी, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.चांदूररेल्वे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर नगर परिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

पुढे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार मा. प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केले. शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने मोर्चा भव्यदिव्य ठरला.मोर्चादरम्यान “नागपूरचा पिंट्या काय म्हणते – सोयाबीनला भाव नाही म्हणते”, “फडणवीस सरकार हाय हाय – शेतकरी सरकार झिंदाबाद”, “हेक्टरी पन्नास हजार द्या – नाहीतर गादी खाली या” अशा प्रचंड घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चातील प्रमुख मागण्या:
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्तव विजबिल तातडीने रद्द करावीत.रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा. गावागावांत सुरू असलेले लोडशेडिंग बंद करून अखंडित वीजपुरवठा द्यावा अश्या मागण्यांचे निवेदन घेऊन तहसीलवर पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले. या सभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या तसेच शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र टीका करण्यात आली.सभेनंतर उपविभागीय कार्यालयात हजर असलेल्या नायब तहसीलदार सुधाकर अनासने व वासनिक यांना देण्यात आले सदर निवेदनात शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिला.अश्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार सुधाकर अनासने व उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार वासनिक यांना देण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर, प्रभाकर वाघ, धामणगांव तहसील अध्यक्ष पंकज वानखडे,श्रीकांत गावड़े,सभापती धामनगांव कविता गावड़े, पूर्व जिप सदस्य अनिता मेश्राम,मोहन सिंघवी, राजू पुरोहित,प्रदीप मुंदड़ा,चंदू डाहाने,महिला अध्यक्ष वर्षा देशमुख,पूर्व नप अध्यक्ष शिटटू सुर्यवंशी,तहसील अध्यक्ष अमोल होले,हर्षल वाघ,प्रफुल्ल कोकाटे,सारंग देशमुख,अतुल चांडक, उपसभापति रविन्द्र देशमुख, गोविंद देशमुख,अशोक चौधरी,महेश कलावटे और तालुका तथा शहर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, अनु. जाती सेल के कार्यकर्ताओं के साथ बड़ी संख्या में किसान,मज़दूर, महिलाओं की उपस्थिति थी।
