
दिनेश शेळके यांनी केले नेतृत्व.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरातील आदिवासी समाजातील काही गरीब गरजू नागरिकांनी शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुल मागणीच्या फायली नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे १ वर्षा अगोदर सादर केल्या होत्या. त्यातील ७७ नागरिकाचा प्रस्ताव नगरपंचायत नांदगाव खंडेश्वरच्या वतीने प्रकल्प अधिकारी, धारणी येथे पाठवून १० महिन्यांच्या वर कालावधी उलटून सुद्धा अद्याप आदिवासी समाजातील एकाही नागरिकाला शबरी घरकुलचा लाभ मिळालेला नाही. त्याकरिता प्रहार संघटनेचे तालुकाध्य दिनेश शेळके यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नांदगाव खंडेश्वर शहरातील आदिवासी समाजाच्या नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रहारचे योगेश ताथोड, बाळू देशमुख, महिंद्रा जोगदंडे, कैलास चांदणे व मंगेश देवळे तसेच आदिवासी समाजातील मनीष भोसले, अनिल भोसले, महानंदा भोसले, मयूर भोसले, मिटून भोसले, राजेंद्र भोसले, प्रतीक पवार, महानंदा भोसले, चंदा भोसले, माधुरी पवार, सुरेखा भोसले इत्यादी उपस्थित होते.