
अ. भा. किसान सभेची मागणी, तालुका कृषी अधिकारी यांना दिले निवेदन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय किसान सभा, नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटी यांचे वतीने दि. 17/6/2025 तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन आले निवेदनात मटले की, शेतकरी बांधव सध्या पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्याच्या, खतांच्या खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेला आहे. मान्सूनची चाहूल लागलेली आहे. यातच बोगस बियाणे – खते,, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारतात. कुठल्याही प्रकारची उगवण क्षमता तपासणी न करता खुलेआम विक्री करताना आपल्या विभागाने पकडून कारवाई केलेली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व कृषी केंद्राची तपासणी करून तातडीने बोगस बियाण्याच्या – खतांचा, कीटकनाशकांचा शोध घेऊन योग्य तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. बोगस बियाणे, खते, शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडते. कुठलीही इतर आर्थिक मदत मिळत नाही. कृषी केंद्राकडे बोगस बियाणे – खते कीटकनाशके याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकरी भावाला उडवा – उडवीची उत्तरे देऊन निराश करतात.
सध्याचा पेरणीचा हंगाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. नव्या हंगामा करिता मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड पेरणी होणार आहे. मुळात या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीन, तुर, कपाशी यावरच ठरले असते. पेरलेले बियाणे बोगस असले ते, उगवले नाही तर, संपूर्ण आर्थिक वर्ष संकटात येऊन. दुबार – तिबार पेरणीचे संकट उभे होते. तरही उगवले नाही तर शेती पडीत राहते. म्हणून आपण संबंधित तालुक्यातील कृषी केंद्राची पाहणी करून बोगस बियाण्याचा शोधघ्यावा व बोगस विक्रीदार आढळून आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा किसान सभेच्या वतीने शेतकरी भावांना एकजूट करून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन देतेवेळी.
कॉ. शाम शिंदे, जिल्हा सचिव किसान सभा,कॉ. अनिल मारोटकर, तालुका अध्यक्ष, कॉ. अशोक केसरखाने, तालुका उपाध्यक्ष कॉ. दिलीप महल्ले, तालुका सचिव. अनिल मारोटकर आदी उपस्थित होते.