
आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन, भारत मंच ट्रस्ट नवी दिल्लीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
तसेच अमरावतीच्या सहा जणांना भारत भूषण पुरस्कार २०२५
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा आहे .ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देश अभिमानाने भरला आहे आणि या ऑपरेशन दरम्यान भारतीय सैन्याने दाखवलेले धैर्य जगासमोर आदर्श आहे ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन भारत मंच ट्रस्ट नवी दिल्लीच्या वतीने २२ जुन रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहान देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून अमरावतीकरासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अमरावतीच्या सुदर्शनजी जैन विश्वस्त – भारतीय जैन संघटनायांना यावर्षी जीवन गौरव पुरस्कार जाहीर तर मरावतीच्या सहा जणांना भारत भूषण पुरस्कार २०२५ घोषित करण्यात आला आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या या सम्मान सोहळ्याचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता या करतील तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदास आठवले, केन्द्रीय राज्यमंत्री ना मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार श्री बळवंत वानखडे, हे राहणार आहेत अमरावती हा कार्य कर्तृत्वाचा जिल्हा आहे.
या जिल्ह्यातून अनेक नामवंतांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे.त्यांचा रूपाने अमरावतीच्या मातीला विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सामाजिक सांस्कृतिकशैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अमरावतीचे नाव त्यांच्यामुळे जागतिक स्तरावर गाजलेआहे ही अमरावतीची गौरवशाली परंपरा आहे आणि हा अमरावतीचा गौरव सुद्धा आहे. या शहराचा गौरवशाली इतिहास आहे.
या शहरातुन अनेक मोठ मोठ्या व्यक्तींनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले.अमरावतीच्या व्यक्तींनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे ओप्राशन सिंदूर विजयाचे उत्सवाचे औचित्य साधून आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन, भारत मंच ट्रस्ट नवी दिल्ली व टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने अमरावतीच्या सहा कर्तृत्वान व्यक्तींचा दिल्लीत गौरव करण्यात येणार आहेत त्यांमधे अमरावतीच्या सुदर्शनजी जैन विश्वस्त – भारतीय जैन संघटना यांना यावर्षी जीवन गौरव पुरस्कार तर शिक्षण क्षेत्रासाठी उत्कृष्ट कुलगुरू पुरस्कारासाठी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविराज देशमुख, पोलीस प्रशासनिक सेवेसाठी डॉ नवीन चंद्र रेड्डी, उत्कृष्ठ राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोन्डे, उत्कृष्ठ विधानसभा सदस्य पुरस्कार आमदार रवी राणा याना जाहीर झाला आहे.
यासोबतच जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकता रैली आयोजन समितीचे श्री राजू ननावरे याची देखील विशेष राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड नागरिकांच्या रेटिंग आणि निवड समितीच्या निर्णयानुसार करण्यात आले असून ऑपरेशन सिंदूर जल्लोष तिरंगा यात्रा उदघाटन निमित्त राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपल्यावर सर्व पुरस्कार्थीं राष्ट्रपती भवनाला देखील भेट देणार आहे हे विशेष पुरस्कार स्वरूप शाल श्रीफळ, सन्मान पत्र, स्मृति चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रम टीम झेनिथ इंटरनॅशनल अमरावतीच्यावतीने सादर करण्यात येणार आहे ज्यात अमरावतीच्या कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करणाऱ्यांची सुवर्ण संधी मिळणार आहे.