
सावित्रीदेवी राणा ‘आदर्श मातोश्री’ व सुदर्शन गांग ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
देशाला विकसित करण्यामध्ये महिला शक्तीचा सिंहाचा वाटा राहिला आहे याच महिला शक्तीने देश स्वतंत्र पासून तर देश विकासामध्ये आपली भागीदारी सुनिश्चित केली आहे महिला या समाजासाठी दिशादर्शक असतात आणि त्यातही आमदार रवी राणा यांच्या मातोश्री सावित्री देवी गंगाधर राहणार या महिलांसाठी आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी नामांकित सिनेट सदस्य , खाजगी सचिव डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी केले ते राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. मनीष गवई आणि संपादक विजय गायकवाड यांच्या संयुक्त अभिष्टचिंतन सोहळया प्रसंगी बोलत होते. हा संयुक्त वाढदिवस अभिष्टचिंतन समारंभ नुकताच स्थानिक जोशी हॉल येथे संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने, पेड माँ के नाम या उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला आणि अनेक मान्यवरांना गौरव पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.
अमरावतीचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा कल्याण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे राजदूत डॉ. मनीष गवई यांनी सामाजिक शिक्षण व युवक कल्याण क्षेत्रात महत्त्वाचे आणि उल्लेखनीय काम केले आहे. या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संध्याकाळचे दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड हे देखील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत डॉ मनीष गवई यांनी सामाजिक जबाबदारी दाखवत त्यांनी सकाळी वृद्धाश्रमातील वृद्ध पालकांचा सन्मान केला आणि नाश्ता वाटप केला तसेच इर्विन हॉस्पिटलमधील रुग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले. . या कार्यक्रमात स्थानिक कलाकार संघटना , झेनिथ युथ क्लब , नुपूर डान्स अकादमी यांच्या वतीने नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करून सामाजिक संदेश देण्यात आला . इतकेच नाही तर जोशी हॉलमध्ये आयोजित अभिष्टचिंतन समारंभाच्या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ऑनलाइन पद्धतीने सुरू केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक) , सुदर्शनजी गांग आणि डॉ. गोविंद कासट (सामाजिक कार्यकर्ते)यांनी भूषविले .सोहळ्याचे उद्घाटक म्हणून अनिल बोंडे (खासदार) , रवी राणा (आमदार), नवनीत राणा (माजी खासदार) , ज्ञानेश्वरराव धने पाटील , माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती . धर्म गुरु म्हणून आदरणीय संतोषसाई महाराज , आदरणीय राजेशसाई महाराज , सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिरसागर (मानवाधिकार अभियानाचे कार्याध्यक्ष) , मनीष साठे (प्रदेश अध्यक्ष आझाद समाज पक्ष) , ॲड. प्रशांत देशपांडे (प्रसिद्ध वकील) , नानकजी आहुजा (संपादक प्रतिदिन प्रतिष्ठा) , नितीन धांडे (भाजप अमरावती शहर जिल्हाध्यक्ष) , विक्रमजीत कलाणे (विदर्भ प्रांत संघ) , राजेंद्र वाटाणे (अध्यक्ष रमाई ब्रिगेड), आनंद मरघडे (अजरे) शेखर (नंबर) , शेखर फुंडकर (अध्यक्ष ) नितेश तेलमोरे (अध्यक्ष क्रांती सेना) , डॉ. प्रदीप. दंदे (माजी नगर सेवक) , राजू नन्नवरे (एकता रॅली) , मंगेश मनोहरे (माळी नगर सेवक) , रामेश्वर अभ्यंकर , राजेश वानखडे (अध्यक्ष भीम ब्रिगेड) , राहुल कविटकर (आजारी सेवक) , नितीन बोरेकर ( सामाजिक कार्यकर्ते , भूषण बनसोड (माजी नगर सेवक) , अरुण वानखडे (तथागत टीव्ही वाहिनी) आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे नेते व अभिनंदन सहकारी बँकेचे संचालक व ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शन गंग यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर या वेळी बडनेरा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील राणा यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्रीदेवी गंगाधर राणा यांना “आदर्श मातोश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार रवी राणा यांना घडवण्याचे आणि संस्कार देण्याचे काम त्यांच्या मातोश्री सावित्रीदेवी राणा यांनी केले असून आज समाजामध्ये समाजसेवेचे व्रत घेऊन आमदार रवी राणा आपल्या मातोश्रीच्या आशीर्वादानेच हे कार्य करीत आहे त्यामुळे त्यांनी जीवनात जो संघर्ष रविभाऊ राणा यांना मोठा करण्यासाठी केला आहे त्या संघर्षाला देखील महिला शक्तीने आदर्श म्हणून आपल्या जीवनासमोर ठेवावा आणि सावित्रीदेवी राणा यांच्यासारखे कार्य आपण देखील करावे असे आणि मॉडर्न आई झाल्यापेक्षा आयडल मदर म्हणून महिलांनी कार्य करण्याचे आव्हान देखील याप्रसंगी डॉ मनीष गवई यांनी केले आणि पुढच्या वर्षी महिलांसाठी आदर्श माता पुरस्कार सोहळा हा मातोश्री सावित्रीदेवी राणा या नावाने पुरस्कार देणार असलयाची घोषणा देखील त्यांनी केली
या कार्यक्रमादरम्यान सामाजिक क्षेत्रातील डॉ. प्रमोद गारोडे (अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार) , सुदर्शनजी गंग (महाराष्ट्र भूषण पुरस्कार) , चंद्रकुमार जाजोदिया (महाराष्ट्र उद्योगश्री पुरस्कार) , पुरणसेठ हबलानी (औद्योगिक) , कैलाश गिरडकर (इंदूराव पाटील) (उद्योगश्री पुरस्कार) , कैलाश गिरडकर (उद्योगश्री) पुरस्कार) , डॉ. सुधीर तायडे (भीमरत्न पुरस्कार) , इ. डॉ. सुनील गजभिये (भीमरत्न पुरस्कार) , वासू महाराज (शिवरत्न पुरस्कार) , प्रज्वल मालू (विदर्भ उद्योगश्री पुरस्कार) , वरुण मालू (विदर्भ उद्योगश्री पुरस्कार), वरुण मालू (विदर्भ उद्योगश्री पुरस्कार) , डॉ. सुनील गजभिये (भीमरत्न पुरस्कार) सावित्री गंगाधरजी राणा (आदर्श मातोश्री पुरस्कार) , रविराज देशमुख (सामाजिक सौंदर्य पुरस्कार) , सुचिता बर्वे संगीता पाटील डॉ रोमा बजाज (नारीशक्ती पुरस्कार) , विजय ओडे , जितेंद्र रोडे , सुधीर गणवीर (अमरावती दर्पण पुरस्कार) , कु. सायली वानखडे (क्रीडारत्न पुरस्कार) , प्रकाश मेश्राम , भरत मोंढे , विशाल तराळ, राहुल तायडे (कलारत्न पुरस्कार) , संजय अग्रवाल (विदर्भ उद्योगश्री पुरस्कार) , लईक पटेल (उद्योजक) , अर्पित बिजवे (उद्योजक) , बंडू आठवले (दर्पण पुरस्कार) , विशाल आनंद (आदर्श अधिकारी पुरस्कार) , जगदीश गोवर्धन (आदर्श शिक्षक पुरस्कार) , प्रवीण वासनिक पर्यावरण पुरस्कार डॉ . सिद्धार्थ मनोहरे व डॉ. अबरार (आरोग्य सेवक पुरस्कार) , सचिन कलंत्रे (स्वच्छता दूत पुरस्कार) , प्रा. डॉ. कुणाल इंगळे (कलारत्न पुरस्कार) (विभाग प्रमुख संगीत विद्यापीठ , मुंबई विद्या. मुंबई) , संविधान मनोहरे (कलारत्न पुरस्कार) , रश्मी सोनाने , प्रज्ञा राऊत , विजय खंडारे , देविदास इंगोले , मेहबूब शाह (अभिनेता) (अभिनेता) (वि. सुरेंद्र परवातकर) उद्योगश्री पुरस्कार) , तन्वीर आलम (इनोव्हेटर) , तन्नू सेठ (इनोव्हेटर) , नयन मोंढे (दर्पण पुरस्कार) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपस्थिताना एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत झाडांचे वाटप करण्यात आले व या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन अभियानाला चालना देण्यात आली आणि सुमारे एक हजार झाडांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक समितीचे स्वागताध्यक्ष मनोज बख्तार , आनंद मरघडे , राजेंद्र वाटाणे , मीरा कोलटक्के , नीता डाखोडे , गणेशदास गायकवाड , मनोज खंडारे , राजाभाऊ गडलिंग , विनोद गुल देवकर , संतोष कोलटक्के , रणमाळे, उताराम बालटक्के , मुंबई पालटक्के, रणगाडे , उमराव पाटील,या कार्यक्रमात मिथिल कळंबे , सनित प्रकाश मेश्राम , संतोष मरघडे , गणेशदास गायकवाड , लायकभाई पटेल , डॉ. रुपेश खडसे , पंकज जाधव , अनिल चव्हाण , संतोष सोनटक्के , संतोष चव्हाण जनसंपर्क अधिकारी यवतमाळ , चंद कुमार भाऊजी, चंदराव शेळके, नरेंद्र गुलदेवकर, अक्षय नागराळे, तन्वीर , आलम तन्नू शेठ , कैलास गिरोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे संचालन वंदन सोनोने, जगदीश गोरवधन यांनी केले.